‘गोकुळ’ निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुराडे, देसाई यांचे अर्ज दाखल

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण गटातून आठ, तर महिला गटातून तीन असे एकूण ११ अर्ज दाखल झाले. यामध्ये संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शेतकरी संघाचे माजी संचालक सुरेशराव देसाई, हंबीरराव वळके, अॅड. सुरेश कुराडे आणि रेखा सुरेश कुराडे यांचा समावेश आहे. दिवसभरात १३० उमेदवारी अर्जांची विक्री झाली; मात्र अर्ज दाखल करण्यास तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत विविध गटांतून एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी सर्वाधिक नऊ अर्ज सर्वसाधारण गटातील आहेत. पहिल्या दिवशी तब्बल ४७० अर्जांची विक्री झाली होती, तर दुसऱ्या दिवशी १३० अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत ६०० अर्जांची विक्री झाली आहे. तसेच सुमारे ५० मतदार यादींची विक्री झाली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, जनसुराज्य पक्षासह इतर इच्छुक उमेदवार आज, गुरुवारी मुहूर्तावर अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार, २२ सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुटी असल्याने आज मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत आघाडीचे इच्छुक उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सुमारे ३०० ते ४०० समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाजप वगळता महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार कधी अर्ज दाखल करणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

‘गोकुळ’ची निवडणूक एकसंधपणे लढणार : विश्वास पाटील

‘गोकुळ’ची निवडणूक आम्ही एकसंधपणे लढणार आहोत. भाजप बाजूला नाही, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पॅनेलची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट होईल. संघ आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध झाली तर ते चांगलेच आहे. आमचे उमेदवार मुंबईत नव्हे, तर कोल्हापुरातच ठरतील, असे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.‘आम्ही सांगितल्याशिवाय ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका,’ असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितले होते. त्याचे पालन मी केले आणि महायुतीचाच अध्यक्ष झाला. संस्था अपात्र करणारी शक्ती अदृश्य असल्याने ती मला दिसत नाही, असे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.

‘आबाजीं’च्या कुटुंबातून आठ अर्ज

‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांनी सर्वसाधारण गटातून दोन, तर इतर मागासवर्गीय गटातून दोन असे एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे सुपुत्र सचिन पाटील यांनी इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या स्नुषा पल्लवी सचिन पाटील यांनी सर्वसाधारण गटासह महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पाटील कुटुंबातून एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत.

 

PM-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा : जिल्हाधिकारी

PM-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा : जिल्हाधिकारी

२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याशी आधार संलग्न करणे (Aadhaar Seeding), भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) आणि AgriStack नोंदणी...

हमीभाव योजनेसाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

हमीभाव योजनेसाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

कोल्हापूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात धान (भात) विक्रीसाठी १० ठिकाणी, तर नाचणी विक्रीसाठी ५ ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२६-२७ साठी शासनाने धानाचा (भात) प्रतिक्विंटल २ हजार...

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'सह्याद्री' अतिथीगृहात ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित...

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात अचानक झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारतातील सरकारी तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार पोहोचले आहे. याचा थेट परिणाम भारतीय तेल...

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

कोल्हापूर : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम...

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांसोबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता, त्याचे संभाव्य फायदे तसेच प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याची भूमिका आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केली....