PM-KISAN लाभासाठी ई-केवायसी, आधार/लँड सीडिंग व AgriStack नोंदणी करा : जिल्हाधिकारी

२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याशी आधार संलग्न करणे (Aadhaar Seeding), भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) आणि AgriStack नोंदणी या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी कोणती कार्यवाही करावी ?

ई-केवायसी पूर्ण करणे : शेतकरी PM-KISAN पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे जाऊनही ई-केवायसी पूर्ण करता येईल.
बँक खात्याशी आधार संलग्न करणे : ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही, त्यांनी संबंधित बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे. तसेच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत नवीन आधार लिंक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) : जमिनीची नोंद PM-KISAN पोर्टलवर प्रलंबित असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
AgriStack अंतर्गत Farmer ID : संबंधित गावातील आपले सरकार सेवा केंद्र, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या माध्यमातून AgriStack अंतर्गत प्रलंबित Farmer ID काढून घेण्याची कार्यवाही करावी.

या विशेष मोहिमेदरम्यान गावपातळीवर प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून आवश्यक कार्यवाहीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी दि. ३१ ऑक्टोबर पूर्वी ई-केवायसी, आधार सीडिंग, लँड सीडिंग व AgriStack Farmer ID संदर्भातील आवश्यक कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Amaron

Amaron

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुराडे, देसाई यांचे अर्ज दाखल

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुराडे, देसाई यांचे अर्ज दाखल

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण गटातून आठ, तर महिला गटातून तीन असे एकूण ११ अर्ज दाखल झाले. यामध्ये संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शेतकरी संघाचे माजी संचालक सुरेशराव देसाई, हंबीरराव वळके,...

हमीभाव योजनेसाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

हमीभाव योजनेसाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक आयडी बंधनकारक

कोल्हापूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात धान (भात) विक्रीसाठी १० ठिकाणी, तर नाचणी विक्रीसाठी ५ ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२६-२७ साठी शासनाने धानाचा (भात) प्रतिक्विंटल २ हजार...

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम यंदा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'सह्याद्री' अतिथीगृहात ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित...

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

देशात इंधनाचे दर वाढणार? पेट्रोलवर ₹५ आणि डिझेलवर ₹२३/लीटरचे नुकसान; क्रूड $१०० च्या पार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात अचानक झालेल्या मोठ्या वाढीमुळे भारतातील सरकारी तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार पोहोचले आहे. याचा थेट परिणाम भारतीय तेल...

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

‘मेरा रेशीम मेरा अभिमान’ अंतर्गत क्षेत्रिय भेट कार्यक्रम

कोल्हापूर : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम...

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शक्तिपीठ महामार्गामुळे विकासाला चालना; शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांसोबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता, त्याचे संभाव्य फायदे तसेच प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याची भूमिका आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केली....